संतोष सोनवणे नाशिक
संपर्क- 7378635614
भारतात सध्या अनेक राज्यांमध्ये बायोफ्लॉक मत्सपालन शेती पद्धत केली जात आहे. दरम्यान शाश्वत मत्स्यपालन पद्धती आणि अन्नसुरक्षेला चालना देण्यासाठी भारत सरकारने अलीकडेच बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केले आहे.
मत्स्यपालन करण्यासाठी बायोफ्लॉक्स वापरून ज्या पाण्यात मासे आहेत ते पाणी स्वच्छ आणि हानिकारक रसायनांपासून मुक्त ठेवले जाते. बायोफ्लॉक्स हे जिवंत सूक्ष्मजीव आहेत जे सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यास आणि पाणी स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. बायोफ्लॉक्स अन्न आणि घरगुती वापरातील अन्न ओला कचरा पाण्यात टाकून तयार केला जातो.
बायोफ्लॉक मत्सपालन ही पद्धत पर्यावरणास अनुकूल असल्याने भारत सरकारकडून आता बायोफ्लॉक फिश फार्मिंगला सबसिडी दिली जात आहे.
बायोफ्लॉक मत्स्यपालनात पाण्याचा वापर कमी होत असतो. मत्स्यपालनाच्या या पद्धतीमध्ये रसायने किंवा प्रतिजैविकांचीही आवश्यकता नसते. भारत सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत बायोफ्लॉक मत्स्यपालनासाठी अनुदान जाहीर केले आहे.
या योजनेचा उद्देश देशातील शाश्वत मत्स्यव्यवसाय विकासाला चालना देण्याचा आहे. PMMSY अंतर्गत, बायोफ्लॉक फिश फार्म उभारण्यासाठी सरकार ४०% पर्यंत सबसिडी देणार आहे.
याशिवाय, सरकार शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देखील करणार आहे. दरम्यान हा व्यवसाय उभा करण्यासाठी अनुदानाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
कागदपत्रांसह संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. एक समिती अर्जाचे पुनरावलोकन करेल आणि पात्र ठरल्यास शेतकऱ्याला अनुदान देण्यात येते.
source